रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे.

पाटणा : नितीशकुमार यांची रालोआने मुख्यमंत्रीपदी फेरनिवड केली असली तरी ते या पदावर फार काळ राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला आहे. जनतेने नितीश यांच्याविरोधात कौल दिला असून, ते तो पायदळी तुडवत असल्याची टीकाही झा यांनी केली.
रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे. असे असताना ४० आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविण्यात येत असल्याचे झा म्हणाले. नितीश यांना लोकांनी नाकारले आहे. लोकांच्या इच्छेचा त्यांनी मान राखायला हवा. तरीही ते हट्टाने मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहिले असल्याचे झा म्हणाले. नितीशकुमार फार काळ मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी अखेरीस केला.


